नवी दिल्ली : राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं. यामुळे राज्यपाल पदावरील व्यक्तीला परवानगी नाकारल्याने भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. यावरून भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या सर्व घटनाक्रमावर भाष्य केले आहे. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी कामासाठी उत्तराखंडला जाणार होते. त्यामुळे नियमानुसार त्यांना सरकारी विमान नाकारण्यात आले. सरकारने राज्यघटनेतील नियमांचं पालन करणे’, हा अहंकार आहे का, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपाला फटकारले आहे.
‘कोरोनाचा धोका असल्यामुळे आपण सरकारी विमानाने प्रवास करण्याचे ठरवले’, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले. मात्र, खासगी विमानात कोरोनाचा धोका नाही, असे कोणी सांगितले आहे का’, असे म्हणत राज्यपालांना कोरोनाची भीती वाटत असेल तर, त्यांचं वय पाहता त्यांनी राजभवनातच राहिलं पाहिजे अशी, कोपरखळी राऊत यांनी मारली.
महत्वाच्या बातम्या
- ‘तू नगरपरिषद मे क्यू आया, यहां से निकल जा’ असे म्हणत नगराध्यक्षकाने केली मारहाण
- 10 हजार रुपये किमतीच्या विदेशी श्वानाची कारमधून ‘धूम’स्टाइल चोरी
- मोदींची पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं मोदींना प्रत्युत्तर
- जाणून घ्या ‘फास्टॅग’ च्या ‘या’ नियमात झाले बदल
- खोट्या कोरोना टेस्ट करून अधिकारी आणि नेत्यांनी कोट्यावधी रुपयांचा केला भ्रष्टाचार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

