टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकारला मिळालेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक कामे मार्गी लागली आहेत. परंतु राज्यातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी पडला. पुढील पाच वर्षांचा कालावधीही भाजप सरकारला मिळाल्यास सर्व कामे करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक पंढरपूर येथे आले होते. यादरम्यान विश्रामगृह येथे पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करताना यापुढेही पंढरपुरात येण्याची संधी मिळावी, असे सांगत विठ्ठलाला काय साकडे घातले याचे संकेत दिले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

