Share

‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. भारताचे प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून २९ जून ते १ जुलै पर्यंतचा आपला क्वारंटाईन कालावधीत पूर्ण करून सर्व खेळाडू आता एकत्र आले आहेत. २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५ जुलैपासून हा संघ एकत्र सराव करण्यास सुरुवात करतील, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

भारतीय संघाचे श्रीलंकेतील पहिले सराव सत्र शुक्रवारी पार पडले. भारताचे खेळाडू सोमवारी श्रीलंकेत दाखल झाले होते. दाखल झाल्यानंतर त्यांना पुढील तीन दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. परंतु, आता त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. सरावाचे काही फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर केले आहेत. तसेच क्वारंटाईन संपला असून टीम इंडियाने सरावला सुरुवात केली आहे असे कॅपशन देखील दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!