नवी दिल्ली: सध्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. यावेळी अधिवेशनाचे पहिले सत्र १३ फेब्रुवारीला संपत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (12 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्पावर विचारलेल्या प्रश्नांना राज्यसभेत उत्तर देणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 1फेब्रुवारीला 2021-22 मध्ये लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला होता. यावर आता राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 13 फेब्रुवारीला संपत आहे. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाचे दुसरे सत्र 8 मार्चला सुरू होत आहे. तर 8 एप्रिलला हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच नवीन सुधारणांसाठी महत्वाचे निर्णय घेतले यामध्ये 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना आयटी रिटर्न भरण्यापासून सुटआरोग्य क्षेत्रासाठी 2.23 लाख कोटींची तरतूदनव्या आरोग्य योजनेसाठी 64 हजार कोटींच्या तरतूदीची घोषणाकोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूदमिशन पोषण 2.0 चा शुभारंभ करणार16.5 लाख कोटी कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्टलहान सिंचन प्रकल्पांसाठी 5 हजार कोटींची तरतूदरस्ते मंत्रालयासाठी 1.18 लाख कोटींची तरतूद मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद अशा घोषणांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- ई-रिक्षा चालवणारी कोण आहे ‘हि’ अभिनेत्री ?
- गावकऱ्यांच्या मागणीची सोनू कडून दखल; पकडून दिले वानर…
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- राज्यपालांना विमान नाकारलं, अजित पवार म्हणतात…
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

