टीम महाराष्ट्र देशा : आपल्या देशात जाती व्यवस्था अजूनही टिकून आहे. थोडाथोडा बदल होतोय पण या बदलाचा वेग मंद आहे. ग्रामिण भागत आजूनही जातीयता आहे. जातीवरून आजही हिणवल जात. अस परखड मत सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले आहे.
जागतिक मराठी अकादमी, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकासमंच व सेंटर फॉर ट्रान्सफॉरिमग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पीएनपी नाट्यगृहामध्ये शोध मराठी मनाचा २०२० हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या शेवटच्या सत्रात नगराज मंजूळे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.
दरम्यान, प्रत्येकाला बोलू दिल पाहिजे. संवाद साधला पाहिजे. त्याची बाजू सामजून घेतली पाहिजे. दडपून टाकणे योग्य नाही. दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा कधीतरी विस्फोट होतो. भावनांचा उद्रेक होऊन त्या मार्ग बदलतात, अस म्हणत त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर देखील आपले मत मांडले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

