मुंबई : उस्मानाबाद आणि लोहारा या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगातल्या त्रुटींमुळे सोयाबीन उत्पादक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना एकूण ५६ कोटी ६१ लाख रूपये नुकसान भरपाई, देण्याचे निर्देश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते.
सात महसूल मंडळातल्या ५८ हजार २३६ शेतकऱ्यांना ५३ कोटी ६८ लाख तर लोहारा तालुक्यातल्या एका महसूल मंडळातल्या ८ हजार ५३९ सहभागी शेतकऱ्यांना दोन कोटी ९३ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, असं देशमुख यांनी सांगितलं.