नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना देखील गेल्या सहा महिन्यांपापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे.
कोरोना संकटकाळात संयुक्त किसान मोर्चाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. कारण आज कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशातच शेतकऱ्यांनी सर्व देशवासियांना या आंदोलनाला समर्थन करण्याचं आवाहन केलं असून तसेच आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शवण्यास सांगितलं आहे.
तसेच निषेध व्यक्त करत पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचंही आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी शेतकरी नव्या कृषी कायद्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. आतापर्यंत आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र आणि शेतकरी संघटनांमध्ये 11 बैठका झाल्या आहेत.तरी देखील अजूनपर्यंत यावर तोडगा काही निघत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेता सलमान खानने केआरकेच्या विरोधात केला मानहानीचा दावा
- ‘हेमा मालिनी एक महान कलाकार आहे’; सावत्र नातवाने केले कौतुक
- होम आयसोलेशनवर बंदी घालण्याचा निर्णय अव्यवहार्य; पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली नाराजी
- ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मिळणार बळ,राज्य सरकारने केला ‘हा’ आदेश जारी
- ‘बाप लेकीची मिठी जी चिरंतन राहील’; विलासरावाच्या जयंतीनिमित्त जेनेलियाची भावुक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
