Share

समृद्धी महामार्गावरून मनसे-शिवसेना आमने सामने ; एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Published On: 

ठाणे : समृद्धी महामार्गाचं काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच केलं जात आहे, शेतकऱ्यांच समाधान झाल्याशिवाय आम्ही हे काम पुढे घेऊन जात नाही त्यामुळेच शेतकरी स्वतःहून जमीन देण्यास पुढे येत आहेत. असा दावा सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शनिवारी ठाण्यातल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरुन सरकारवर तोफ डागली होती. आता यावरून एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

सरकार समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना विश्वासात घेत नसून, या महामार्गाच्या आडून वेगळ्या विदर्भाची चूल रचली जात असल्याचा थेट आरोप राज ठाकरेंनी केला होता. असं होत असेल तर समृद्धी महामार्गाला विरोध करू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यावर एकनाथ शिंदेंनी डोंबिवलीत सरकारची भूमिका मांडली. आता समृद्धी महामार्गावरून मनसे आणि शिवसेना आमने-सामने आल्याच चित्र आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!