Share

विद्यार्थ्यांच्या खास मागणीस्तव स्मार्ट सिटी बस आता नाईकनगरपर्यंत

Published On: 

औरंगाबाद : प्रवाशांची विशेषतः विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन औरंगपुरा ते शिवाजीनगरकडे जाणाऱ्या स्मार्ट सिटी बसेस आता नाईकनगर पर्यंत धावणार आहेत. या निर्णयामुळे शेकडो प्रवाशी, विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊननंतर ब्रेकनंतर सिटी बस सेवा नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणि वैशिष्ट्यासोबत सुरू करण्यात आली. अँड्रॉइडद्वारे संचलित ई-तिकिट सिस्टिम, प्रवाशांना मासिक पासेसची सुविधा देण्यात आली. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्मार्ट सिटी बसेसला मिळत आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) औरंगपुरा ते शिवाजीनगर पर्यंत बस चालवित होती. नाईकनगर पर्यंत सिटी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशी, विद्यार्थ्यांनी केली होती. या मागणीनुसार नव्या वेळापत्रकानुसार शिवाजीनगर येथे पूर्वी संपणाऱ्या मार्गाचे बीड बायपास ओलांडून नाईकनगर पर्यंत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुकूंदवाडी ते शिवाजीनगर आणि शिवाजीनगर ते मुकूंदवाडी मार्गावरही हा बदल करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी बस आता नाईकनगर पर्यंत जाईल आणि नाईक नगर येथून सुरू होईल. स्मार्ट सिटी बस विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक सिध्दार्थ बनसोड म्हणाले की, नाईकनगर जवळ बीडबायपासच्या पुढे राहणाऱ्या विद्यार्थी व रहिवाशांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!