Share

महाराष्ट्रात प्रवास करु नका – एम्सचा सल्ला

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली आहे. मात्र, महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये नवीन स्ट्रेन दाखल झाला आहे. त्यामुळे या राज्यात विनाकारण प्रवास करू नका, असा सल्ला एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलाय.

अद्याप कोरोना संपलेला नाही. लस व्यतिरीक्त आपल्याला केवळ खबरदारी वाचवू शकते. मास्क व्यतिरीक्त स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आणि आयसोलेशन सारख्या सवयी आपल्याला कायम ठेवाव्या लागतील. ब्राझीलमध्ये ७० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या होत्या. मात्र, तिथल्या नागरिकांना देखील पुन्हा कोरोना संसर्ग होत असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दररोज जास्तीत जास्त २,००० रुग्ण समोर येत होते. मात्र, आता आकडा ६००० च्या वर गेलाय. अनेक राज्यात टेस्टिंग कमी झाल्यानेही रुग्ण संख्या कमी दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ९ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना टेस्टिंग वाढवण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!