Share

‘मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुणे, अमरावती, यवतमाळ, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले जात असताना राज्याबाबत उद्धव ठाकरे काही महत्वाचा निर्णय घेणार का ? याकडे सामान्यांचं लक्ष्य लागलं होतं. पुन्हा लॉकडाऊन होणार का ? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना भाष्य केलं आहे.

‘महाराष्ट्रात जवळपास ९ लाख कोरोना युद्ध्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे. बाकी असलेल्या कोव्हीड योद्ध्यांनी देखील अफवांवर विश्वास न ठेवता बेधडकपणे लसीकरण करून घ्यावं,’ अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर, आता सर्वसामान्यांना लस कधी मिळणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. कोणत्या राज्याला किती लस द्यायच्या, कोणत्या देशाला किती लस पुरवायच्या याबाबत केंद्र सरकारच निर्णय घेत आहे. गेल्या आठवड्यात एक बातमी समोर आली होती. दक्षिण आफ्रिकेहुन लसी पुन्हा पाठवण्यात आल्या आहेत. त्या निरुपयोगी नाहीयेत. आपल्या देशामध्ये त्यांचा उपयोग करता येईल,’ असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

याच मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं. आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते सफेद झूठ आहे. आफ्रिकेकडून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!