🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेनंतर आता सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ गडावरून दुष्काळग्रस्त बीडकरांना वॉटरग्रीडचे स्वप्न दाखविले’ असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच वॉटरग्रीडमधून बीडला वगळून दुष्काळग्रस्त जिल्ह्याची सरकारने चेष्टा केली असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथील गोपीनाथगडाच्या कार्यक्रमात राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या धरणे पाईपलाईनने जोडण्याच्या वॉटरग्रीड योजनेत बीड जिल्ह्याचा समावेश करण्याचे जाहीर केले होते. मात्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात बीडला वगळून दुष्काळग्रस्त जिल्ह्याची खोटे बोलून चेष्टा केली असे मुंडे म्हणाले.
धरणे पाईपलाईनने जोडण्याची महत्वकांक्षी वॉटरग्रीड योजना मंजूर झाली. मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ गडावरून दुष्काळग्रस्त बीडकरांना वॉटरग्रीडचे स्वप्न दाखविले. मात्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात बीडला वगळून दुष्काळग्रस्त जिल्ह्याची खोटे बोलून चेष्टा केली. फडणवीस साहेब, क्या हुआ तेरा वादा? pic.twitter.com/t4D1sL0DIZ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 26, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

