Share

अवकाळी पावसासोबत धनंजय मुंडेही सरकारवर बरसले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी काल जोरदार पावसात सरकारला चांगले धो धो धुतले. धनंजय मुंडे म्हणाले, कुर्डूवाडीची हल्लाबोल सभा जशी अवकाळी पावसात होत आहे, तसेच राज्यात आणि देशात भाजपचे अवकाळी सरकार सत्तेवर आले आहे. अवकाळी पाऊस असो की अवकाळी आलेले सरकार दोन्हीही नुकसान करणारे असल्यानेच हे अवकाळी सरकार बदलण्याचा निर्धार करूया. असे मुंडे म्हणाले.

जनतेच्या या भक्कम पाठिंब्यावरच राष्ट्रवादी काँग्रेस २०१९ ला या फसव्या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. जनतेनीही हल्लाबोल यात्रेला चांगला प्रतिसाद दिला. भाजप सरकारला सत्तेवरून खेचण्याचा निर्धारच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सूर आहे.

अजितदादा पवार यांनी सुद्धा सरकारवर तुफान शाब्दिक फटकेबाजी केली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!