टीम महारष्ट्र देशा: “आज कुठलाही शेतकरी वीज बिल भरू शकत नाही. त्यामागे वसुलीचा तगादा लावू नका अन्यथा आम्हालाही शेतक-यासोबत रुमनं हातात घ्यावे लागेल. त्यामुळे ही सक्ती मागे घ्या पंधरा वर्षाच्या नवसाने सत्ता जन्माला आली. मात्र नवसानं मुल झालं अन मुके घेऊन मेलं अशी भाजप-सेनेची अवस्था होईल”. असा घणाघाती टोला विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला आहे.
शेतकऱ्यांनी वीजबिल भरण्यासाठी सध्या सरकारची मोहीम सुरु आहे. पण सध्या शेतकरी वीजबिल भरण्याच्या अवस्थेत नसल्याच धनंजय मुंडेंनी सांगितलय दरम्यान नागपूर मध्ये झालेल्या हल्लाबोल मोर्चात शरद पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांना वीजबिल न भरण्याच अवाहन केल होत.
आज कुठलाही शेतकरी वीज बिल भरू शकत नाही. त्यामागे वसुलीचा तगादा लावू नका अन्यथा आम्हालाही शेतक-यासोबत रुमनं हातात घ्यावे लागेल. त्यामुळे ही सक्ती मागे घ्या
पंधरा वर्षाच्या नवसाने सत्ता जन्माला आली. मात्र नवसानं मुल झालं अन मुके घेऊन मेलं अशी भाजप-सेनेची अवस्था होईल.. pic.twitter.com/6rsyK8Ub8V— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 14, 2017
ओखी वादळामुळे कोकणातील आंबे बागायतदार आणि मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी.
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणून सरकारने गाजावाजा केला. मात्र या योजनेत वीज बिलात कोणतीही सूट दिलेली नाही. #नागपूर #हिवाळीअधिवेशन pic.twitter.com/KVw3040qNi— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 14, 2017
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

