Share

नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं- धनंजय मुंडे

Published On: 

मुरगूड: सरकारने हल्लाबोलचा असा धसका घेतला आहे की आता सरकारमधील लोक टीका करत आहेत. या सरकारमधील मंत्र्यांनी सत्ता येताच मोठ-मोठे भ्रष्टाचार केले आहेत. नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये. अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या टप्प्याला सुरवात झाली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनावर टीका करणा-या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना त्यांच्या खात्यात झालेला तूरीचा २५०० कोटींचा घोटाळा आठवतो का ? स्वतःच्या कारखान्यासाठी शेतक-यांच्या नावावर कर्ज काढून केलेली फसवणूक आणि लूट माहीत आहे का ? अशे प्रश्न उपस्थित केले.

आम्ही काल आई अंबाबाईचा रथ ओढला आणि तिला साकडं घातलं की राज्यात जे सरकार बसलं आहे ते भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ मिळो. दरम्यान, काल देशभरात एप्रिल फूलच्यानिमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोजच एप्रिल फूल होत आहे. अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!