Share

‘स्वत:च्या काकांशी प्रामाणिक राहिला असता तर दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेड पाठोपाठ सोलापूरमध्ये सभा घेत भाजप सरकारची पोलखोल केली आहे, डिजिटल गाव म्हणून सरकारकडून जाहिरात केल्या जाणाऱ्या हरिसाल गावाचा ग्राउंड रिपोर्ट माडल्यानंतर, आता हरीसालच्या जाहिरातीमध्ये ‘मी लाभार्थी’ म्हणून दाखवलेल्या युवकाला थेट स्टेजवर आणत राज यांनी भाजपचा बुरखा फाडला आहे.

राज ठाकरेंच्या फटकाऱ्यांंनी घायाळ झालेल्या भाजपकडून आता ठाकरेंना लक्ष्य केले जात आहे. स्वत:च्या काकांशी प्रामाणिक राहिला असता तर दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान,राज ठाकरे हे आपल्या महाराष्ट्राचे हुशार नेते आहेत पण त्यांनी दोन्ही पक्षांची योग्य ती भूमिका मांडावी अशी माझी ‘एक सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा आहे’, असं महसुल मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=qnv6P6G9VBI

राज ठाकरेंनी लोकसभेच्या रिंगणात मनसेचे काही उमेदवार उभे करून स्वत:च्या पक्षाचा प्रचार करायला हवा होता, असा टोला चंद्रकांत दादा पाटलांनी लगावला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.ज्या काँग्रेसने त्यांच्यावर वारंवार टीका केली. त्याच काँग्रेसचा राज ठाकरे आता प्रचार करत आहे, असही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!