कोल्हापूर : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात देखील थैमान घातला आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक- ५ लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बार देखील सुरु करण्यात आले आहेत.
येत्या काही दिवसात सिनेमागृहे देखील सुरु करण्यात येतील मात्र राज्य सरकारने मंदिर खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवरात्रोत्सव देखील तोंडावर आला असून राज्यातील साडेतीन शक्तीपीठांचे लाखो भाविक भक्त दर्शन घेत असतात त्यामुळे होणाऱ्या उलाढालीवर तीर्थक्षेत्रातील व्यापारी व इतर घटकांना देखील रोजगार उपलब्ध होत असतो. यंदा मात्र कोरोनाचे संकट या उत्सवावर कायम असून व्यापाऱ्यांचा रोष आता वाढत आहे. राज्य सरकारने नियमावली जाहीर करून ही मंदिरे खुली करावीत अशी मागणी कोल्हापूरसह तुळजापूर, वणी, माहूर मधील व्यापारी करत आहेत.
मात्र, अशातच नवरात्रोत्सव काळात कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. परंपरेप्रमाणे नवरात्रौत्सवात सर्व विधी करण्यात येतील. मंदिरात 9 दिवस धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. मंदिराला विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मात्र, नवरात्रौत्सव काळात मंदिराचे चारही दरवाजे बंदच राहतील. नवरात्रौत्सवात सर्व विधीचे थेट प्रक्षेपण कोल्हापूर शहरातील विविध चौकात होईल, अशी माहिती महेश जाधव यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी आहे – रामदास आठवले
- माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का? : संजय राऊत
- कुकडी कारखाना शेतकऱ्यांची चार कोटींची देणी ३० ऑक्टोंबरपर्यंत देणार- राहुल जगताप
- #मराठा_आरक्षण : गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, संभाजीराजेंचा आक्रमक इशारा
- …म्हणून फडणविसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर पवारांच्या आत्मचरित्रातील ‘तो’ उताराच वाचून दाखविला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

