पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार कडुन संचारबंदी, जमावबंदी लागु केली असतानाच राज्याची रुग्ण संख्या मात्र वाढतच असलेली दिसुन येत आहे.
गेल्या पावसाळ्यात महापुरासारख्या संकटाला सामोऱ्या गेलेल्या पश्चिम महाराष्ट्रात हि आता कोरोनाचे सावट पसरत आहे. सांगली, सातारा पाठोपाठ कोल्हापुरात देखील संशयित रुग्ण आढळला आहे.
या सोबतच चिंतेची बाब म्हणजे या रुग्णाने सिपीआर रुग्णालयातून पलायन केल्याचे समजते. दरम्यान पोलीस या रुग्णाचा शोध घेत आहे. हा रुग्ण दुबई येथून आल्याचे समजते. याच बरोबर आज सकाळीच रुग्णांचा आकडा शंभरी पार गेल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
रुग्णांनी पळुन न जाता योग्य ती खबरदारी घेऊन स्वतः सह दुसऱ्यांच्या देखील आरोग्याला हानी पोहोचेल असे कोणतेही पाऊल उचलु नये असे आवाहन महाराष्ट्र देशा टीम तर्फे करत आहोत. दरम्यान राज्यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे होत असल्याचे वृत्त समजत आहे. त्यामुळे हा लढा एकत्र जिंकले पाहिजे.


