टीम महाराष्ट्र देशा – नागरिकत्व कायदा सीएए, एनआरसी, एनपीआर हा विषय गुंतागुंतीचा आहे. केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच नाही तर काँग्रेसला सुद्धा ते स्वत: समजून घ्यावं लागेल. फक्त शिवसेनेला सांगून चालणार नसल्याचं वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेेचे खासदार कुमार केतकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे हे एनआरसी, सीएए, एनपीआर यावर आपली बदलेली भूमिका सांगत आहेत. काही काँग्रेस नेत्यांनी अगोदर एनआरसी, सीएए, एनपीआर आणि कलम ३७० निष्प्रभ करण्याला अगोदरच पाठिंबा जाहीर केला होता असंही केतकर यांनी सांगितलं आहे.
शिवसेना हा कायम भगव्या आघाडीत होता. त्यांना वेगळ्या पद्धतीने समजून सांगावं लागेल. किमान समान कार्यक्रमावर एकजूट असेल तर सरकार पडायचं कारण नसल्याचंही केतकरांनी म्हटलं आहे.
त्यामुळे कॉंग्रेसला यामुद्द्यावरून घराचा आहेर मिळाला आहे असंच म्हणव लागेल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

