टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र कॉंग्रेसने सरकारच्या मुद्रा योजनेवरून सरकारवर निशाणा साधला. एकीकडे खऱ्या गरजुला मुद्रातून कर्ज मिळत नाही तर दुसरीकडे मुद्राच्या हजारो खात्यांमध्ये घोटाळा होतो, अश टीका कॉंग्रेसने केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुद्रा योजनेच्या २३१३ खात्यांमध्ये घोटाळा झाल्याचे संसदेत सांगितले आहे असे म्हणत कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. आधी जलयुक्त शिवार, पीक विमा योजना आणि आता मुद्रा योजनेतही घोटाळा झाल्याचं सरकारने कबुल केलं आहे, अशी टीका कॉंग्रेसने केली.
इतकेच नव्हे तर एकीकडे खऱ्या गरजुला मुद्रातून कर्ज मिळत नाही तर दुसरीकडे मुद्राच्या हजारो खात्यांमध्ये घोटाळा होतो. गाजावाजात सुरू केलेल्या योजनेत घोटाळा होण्यास भाजप सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे, अशी टीकाही कॉंग्रेसने केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

