मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३८७४ नवे रुग्ण आढळून आले. तर १६० जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत ही आतापर्यंत झालेली सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,२८,२०५ इतका झाला आहे. यापैकी ५८,०५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ६४,१५३ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.
मोदीजी हीच वेळ आहे… शत्रूला ५६ इंच छाती दाखवण्याची – चाकणकर
एका बाजूला राज्य सरकारचे अपयश यानिमित्ताने पुढे यायला सुरुवात झाली आहे. एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तज्ज्ञदेखील गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं वारंवार आवाहन करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ घराबाहेर पडा, असं जाहीर पत्रकार परिषदेत सांगत आहेत.
चिनी वस्तुंचा बहिष्कार हीच जवानांना खरी श्रद्धांजली : अभाविप
zee २४ तासने दिलेल्या वृत्तानुसार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असं सांगितलं. पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक वरिष्ठ मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मात्र लोकांना घराबाहेर पडण्याचं आवाहन करत आहेत. राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे वारंवार समोर येत असताना आता भुजबळांच्या विधानाने हे आणखी अधोरखित केले आहे.


