नांदेड : दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
अशोक चव्हाण हे काल परभणी दौऱ्यावर होते. त्यांनी परभणीत मराठवाड्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रस्ते, पूल आदींच्या दुरुस्तीसाठी आढावा बैठक परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले.
विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला.
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री यांच्याकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आंदोलन आता भाजपने आपल्या ताब्यात घेतलं आहे.मुळात बरेच आंदोलक हे भाजपचे हस्तक आहेत असंही चव्हाणांनी पुढे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बळीराजाला कायद्याच्या माध्यमातून उद्योगपतींचा गुलाम बनवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे’
- मुंबईतील २५ अनुदानित कॉलेज बंद पाडण्यापासून वाचवा- कॉंग्रेस
- आपल्याला केवळ सक्षम भारत नकोय तर हरित भारत हवा – उपराष्ट्रपती
- अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भारतीय आयटी व्यावसायिकांना येणार अडचण…
- शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर; नगरच्या गडाखांकडे सांगली, सोलापूर तर मालेगावचे भुसे नगरला!


