🕒 1 min read
मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. परंतु राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना नोकरी-व्यवसाय,शिक्षण व इतर कारणांसाठी रेल्वेने प्रवास करावा लागतो. परंतु सध्या त्यांना परवानगी नसल्यामुळे त्यांची अडचण होत आहे. हे लक्षात घेता दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती सुळे यांनी केली आहे.
हे लक्षात घेता दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra
— Supriya Sule (@supriya_sule) August 18, 2021
दरम्यान, मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरी रेल्वे वाहतूक 14 महिन्यांच्या खंडानंतर सामान्य मुंबईकर प्रवाशांसाठी 15 तारखेपासून सुरू झाली. सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांतील प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असून दररोज लोकल प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त काही प्रमाणात दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांचीही प्रवासात भर पडली. दरम्यान, कल्याण, डोंबिवली आणि बोरिवली, भाईंदर यांसह काही मोजक्याच स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी अधिक होते.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!
- शर्यतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पडळकरांनी हाकली बैलगाडी, पाहा व्हिडिओ
- ‘राज्यपालांनी स्वतःचा पाय पुन्हा धोतरात गुंतवून घेतला’, संजय राऊतांची टीका
- ‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

