मुंबई : आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे मुंबईहून पंढरपूरला आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोबत ड्रायव्हर ठेवला नाही. स्वत: गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर असा दोन्ही साईडचा प्रवास केला. राज्यातील मुख्यमंत्र्याने स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगण्यात येतं.
“मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती बिकट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस”
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तोंडाला मास्क लावल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत. बैठका घ्यायच्या असतील तर त्या ऑनलाइन घेण्यावरही त्यांचा भर असतो. शिवाय करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून कुठेही जायचे असेल तर ते स्वत: गाडी चालवत जात आहेत. त्यांच्या निवासस्थानाहून मंत्रालयात जायचे असेल तरीही ते स्वत: गाडी चालवत जातात. त्यामुळे पंढरपूरला विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी परवा त्यांचा ताफा निघाला, पण त्यांच्या गाडीत ड्रायव्हर नव्हता. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच गाडीतून पंढरपूरला गेले. यावेळी मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत होते.
दरम्यान, यावर आता भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. ‘गाडीचा नव्हे तर राज्याचा सारथी होणं अपेक्षित आहे’ अस ट्विट करत अवधूत वाघ यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.
गाडीचा नव्हे तर राज्याचा सारथी होणं अपेक्षित आहे pic.twitter.com/OaKzdffZQi
— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) July 2, 2020
मोठी बातमी : कोरोना टेस्ट साठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही
तर दुरीकडे भाजप नेते निलेश राणे यांनी देखील यावरूनच मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. ‘म्हणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली. बरोबर आहे, सरकार अधिकारी चालवतायत, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो पण इकडे ७ तास मुख्यमंत्री गाडी चालवतो म्हणजे कोरोना या विषयावर सरकार किती गंभीर आहे दिसून येते. उद्या ते गाडी पण धुतील तर आम्ही काय करू’? अस ट्विट करून निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
म्हणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली. बरोबर आहे, सरकार अधिकारी चालवतायत, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो पण इकडे ७ तास मुख्यमंत्री गाडी चालवतो म्हणजे कोरोना या विषयावर सरकार किती गंभीर आहे दिसून येते. उद्या ते गाडी पण धुतील तर आम्ही काय करू??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 2, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

