Share

छत्रपतींनी कधी महिलांना टार्गेट केले नाही, मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते – सुप्रिया  सुळे

Published On: 

मुंबई  – छत्रपतींचे नाव भाषणात घेणारे दिल्लीतील नेते हे छत्रपतींच्या विचारांकडे दुर्लक्ष करतायत. छत्रपतींनी कधी महिलांना टार्गेट केले नाही. मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर खासदार  सुळे यांनी काल जेव्हा आमच्या बहिणींवर आयकर विभागाने धाड टाकल्याबद्दल कळलं तेव्हा धक्का बसला. ही दुर्दैवी गोष्ट आहे असे खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

दरम्यान मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तीनही बहिणी खंबीर आहेत. त्या यातून बाहेर पडतील. जिजाऊ, सावित्रीमाईंच्या मातीत माझ्या बहिणी जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला याची भीती वाटत नाही अशा शब्दात खासदार सुळे यांनी त्यांना खंबीर साथ दिली आहे.

केंद्रसरकार आणि दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. लखीमपुरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. सत्ता कुणाचीही असली तरी अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे असं देखील सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!