Share

औरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सीईओंनी कसली कंबर

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कोट्यावधींच्या जागा, मालमत्ता भूमाफियांच्या घशात गेल्या आहेत, तर उर्वरित अनेक जागा गिळंकृत करण्यासाठी भूमियांचे प्रयत्न सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी व गेलेल्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जि.प.ने कंबर कसली आहे. त्या दृष्टीने मालमत्ता कक्ष स्थापन करून प्रत्येक जागा, मालमत्तेची स्वतंत्र संचिका तयार करून त्या संरक्षित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी समितीला दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शहरात, तालुक्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा, मालमत्ता आहेत. अनेक ठिकाणी भूमाफियांनी अतिक्रमण केल्यामुळे आणि संबंधित मालमत्तांची कागदपत्रेच सापडत नसल्यामुळे अडचण झालेली आहे. संचिका गायब झाल्यामुळे कोट्यावधींच्या जागा हातातून गेल्या आहेत. या जागा परत मिळवण्यासाठी आणि ज्या आहेत त्या वाचविण्यासाठी प्रत्येक मालमत्तेची संचिका बनविण्यात येणार आहेत. प्रत्येक मालमत्तेचे मोजमाप करायचे, नकाशा तयार करून संबंधित जागांना संरक्षण भिंत बांधून त्या बिओटीवर विकसीत करण्यासाठी देण्यात येणार असल्याचे गटणे यांनी सांगितले.

मागील अनेक दिवसापासून जिल्हा परिषदेच्या बैठकीत जागा वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे बोलले जात होते. मात्र जिल्हा परिषदेच्या मालमत्ता वाचविण्यासाठी आता मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी कंबर कसली आहे. याबाबत अधिकचा अभ्यास असलेले महसूल व नगररचना विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांचा जागेच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींपासून जिल्हा परिषद प्रशासनाला चांगली मदत होईल, असा विश्वास गटणे यांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!