Share

कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काजू बागायतदारांना फटका

Published On: 

बांदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले असून याचा फटका काजू बागायतदारांना बसला. वातावरणाचा देखील फटका बसल्याने आणि यावर्षी उशिरा सुरू झालेले उत्पन्न आणि त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेली काजू खरेदी. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

जिल्ह्यात दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला ही परिसर काजू उत्पनामध्ये अग्रेसर आहेत. परंतु, यावर्षी काजू उत्तपनावर अवलंबून असलेले येथील अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेले आहे. वातावरणातील बदलामुळे मोहोर देखील जळून गेला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बदलून गेले. काजू बागायतीसाठी झालेला खर्च आणि यावर्षी मिळणारे उत्पन्न याचा मेळ न बसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

काजू विक्रीचा दर १०० रुपये प्रतिकिलोच्या खाली उतरल्याने येथील शेतकऱ्यांनी दर वाढीच्या अपेक्षेने काजूची विक्री न करता त्यांनी घरातच साठा करून ठेवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने भविष्यात काजू विक्री होणार की नाही याबाबत शंका आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!