🕒 1 min read
श्रीलंका : एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे. भारताने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ १२६ धावांवर अटोपला. यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक जिंकत श्रीलंकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. सामन्यातील पहिल्याच चेंडुवर पदार्पणवीर पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. यानंतर मधल्या फळीतील इतर फलंदाजानी केलेल्या फलंदाजीमुळे भारताने निर्धारीत २० षटकात ५ गडी गमावत १६४ धावांची मजल मारली. भारताकडून सुर्यकुमार यादवने ३४ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली.
FIFTY for SKY! ???? ????
His 2⃣nd half-century in T20Is. ???? ???? #TeamIndia #SLvIND
Follow the match ???? https://t.co/GGk4rj2ror pic.twitter.com/wa4GS4QnBi
— BCCI (@BCCI) July 25, 2021
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत भारतासाठी चार टी -20 सामने खेळले आहेत आणि तीन डावात त्याने 46.33 च्या सरासरीने 139 धावा केल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या 57 धावा आहे. सूर्यकुमारने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील पहिल्या तीन डावांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या तीन डावात 109 धावा केल्या गौतम गंभीरला मागे टाकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भुवीच्या घातक गोलंदाजीमुळे भारताचा श्रीलंकेवर पहिल्या टी-२०त ३८ धावांनी विजय
- राज्यात आज १२३ रुग्णांचा मृत्यू कोरोनाबाधित ; वाचा आजची आकडेवारी
- तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- अन् अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहून खा. नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा हा व्हिडिओ..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

