🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राजा बाबू हा चित्रपट 21 जानेवारी 1994 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १५ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २.३ कोटी रुपये इतके होते. गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.

जानेवारी 2000 मध्ये आलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने 74 कोटींचा व्यवसाय केला होता. हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा हा डेब्यू चित्रपट होता. त्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.
करण-अर्जुन हा चित्रपट 13 जानेवारी 1995 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ५३ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ६ कोटी रुपये इतके होते. सलमान खान, शाहरुख खान , अमरीश पुरी, काजोल, ममता कुलकर्णी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. तर हा सिनेमा राकेश रोशन यांनी दिग्दर्शन केले आहे.

रंग दे बसंती हा चित्रपट 26 जानेवारी 2006 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट 28 कोटी रुपये इतके होते. २००६ साली रंग दे बसंती हा चित्रपट ऑस्कर साठी नामांकित झाला. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ए. आर . रेहमान ने संगीत दिले होते. यात अमीर खान, माधवन, सिद्धार्थ नारायण, अतुल कुलकर्णी , शर्मन जोशी, सोहा आली खान, वहिदा रेहमान यांच्या भूमिका होत्या.

गुरु हा चित्रपट १२ जानेवारी २००७ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ६३ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २२ कोटी रुपये इतके होते.

यमला पगला दिवाना हा चित्रपट १४ जानेवारी २०११ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ७४ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २९ कोटी रुपये इतके होते.
अग्निपथ हा चित्रपट २६ जानेवारी २०१२ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १६३ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ७१ कोटी रुपये इतके होते.

रेस २ हा चित्रपट २५ जानेवारी २०१३ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १२७ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ९४ कोटी रुपये इतके होते.
एयरलिफ्ट हा चित्रपट २२ जानेवारी २०१६ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १६६ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ६८ कोटी रुपये इतके होते.
हम आपके दिल में रहते हे हा चित्रपट २२ जानेवारी १९९९ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ३६ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ६ कोटी रुपये इतके होते. अनिल कपूर, अनुपम खेर, जॉनी लिवर आणि काजोल यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. तर चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. चित्रपटाला अनु मलिक यांनी संगीत दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

