मुंबई : राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव विजबिलात दिवाळीमध्ये गोड बातमी दिली जाईल असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अचानक युटर्न घेत विज बिल भरावेच लागेल असं म्हणल्यामुळे अव्वाच्या-सव्वा बिल आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाने, व्यावसायिकांनी भरायचं तरी कसं असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य सरकारने वाढीव वीजबिल माफ करण्यासोबतच टाळेबंदी काळातील वीजबिलात सवलत द्यावी, या मागणीसाठी भाजप, मनसेसह इतर अन्य पक्ष देखील तीव्र आक्रमक झाले असून मनसेने राज्य सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर, भाजपने प्रकाशगडावर महिलांसह धडक मोर्चा काढला आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु असलेल्या पाहायला मिळत आहे.
वीजबिलावरून महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरलं जात असतानाच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महावितरणच्या आर्थिक तोट्याला भाजपला जबाबदार धरलं आहे. “विजेमध्ये झालेला तोटा हा भाजपच्या सरकारच्या काळातला आहे. तो त्यांनी वसूल करुन द्यावा. त्यानंतर भाजपने आरोप करावा” असं राऊतांनी सुनावलं आहे. दरम्यान, भाजप सरकारच्या काळात 36 हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील शाळा यंदाच्या वर्षी बंदच!; आयुक्तांनी दिले आदेश
- देशात लवकरच येणार ‘खाजगी रेल्वे’ ! 16 खासगी कंपन्यांकडून अर्ज दाखल…
- ‘भाजप सरकारच्या काळात सीबीआयची अवस्था पानटपरी सारखी झालीय’
- ‘सिर्फ़ बातों की है मोदी सरकार, कुचल रही ग़रीबों के अधिकार’
- कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी वरवरा राव यांना ‘नानावटी’मध्ये हलवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

