Share

‘भाजप – शिवसेना युती म्हणजे आम्ही दोघ भाऊ भाऊ , सगळे मिळून खाऊ’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस पक्षांने जनमानसात विश्वास प्रस्तापित करण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून कॉंग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनमत आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.  आज गोंदिया येथे जनसंघर्ष यात्रा येऊन पोहचली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजप व शिवसेना युतीच्या चर्चेबाबत टीका केली.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, भाजप व शिवसेनेची युतीची चर्चा म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ, या प्रकारची आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची जनता भाजप व शिवसेनेमधला  वाद बघत आहे. त्यामुळे जनतेला देखील आता यांचा दिखाऊपणा कळाला आहे. शिवसेना, भाजप सध्या एकमेकांत भांडत आहेत. शिवसेना एकीकडे भाजपवर टीका करते व दुसरीकडे सत्तेचे श्रीखंड खाते. त्यामुळे हे भांडण दाखवण्या पुरते आहे. अशी टीका यावेळी चव्हाणांनी केली.

दरम्यान, दुष्काळाची दाहकता असताना शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय हे सरकार घेत नाही त्यामुळे अशा सरकारला तुम्हीच घराचा रस्ता दाखवा, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी  केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!