🕒 1 min read
मुंबई : अयोध्या दौरा हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेतली बाब आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही अयोध्या दर्शन केले. पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचाही १० जून रोजी अयोध्या दौरा होणार आहे. आता राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्यामुळे चर्चेत आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून राज ठाकरेंवर खोचक टोला लगावला, यानंतर आता काँग्रेसनं देखील राज ठाकरेंच्या या कृतीला डिवचलं आहे, तसेच भाजपावर देखील टीका केली आहे.
राज ठाकरे यांनीं आपला अयोध्या दौरा स्थगित करण्यात असल्याचे ट्विट करून सांगितले. राज ठाकरेंची प्रकृती बरी नसल्याने स्थगितीचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांनां खोचक टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपानेच केले.पण हिंदूत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणिवपूर्वक मनसेची कुचंबणा केली. pic.twitter.com/xWUDwRnyez
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 20, 2022
आपल्या ट्वीटमधून सचिन सावंत यांनी म्हंटले आहे की, राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपानेच केले.पण हिंदूत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणिवपूर्वक मनसेची कुचंबणा केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

