टीम महाराष्ट्र देशा- देशातील ५४२ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.पश्चिम बंगालमध्ये भाजपने प्रचंड जोर लावला होता. आता २०१४ मध्ये फक्त २ जागा असलेला बंगालमध्ये भाजपने तब्बल १७ जागांवर आघाडी घेतली आहे.
२०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत ४२ पैकी ३४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ४, भाजपला २ तर डाव्या आघाडीला २ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.दरम्यान,तृणमूल काँग्रेस २४ जागांवर आता आघाडीवर आहे.


