Share

खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच भाजपकडून चिडून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर – जयंत पाटील

Published On: 

मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर ईडीने खडसेंना समन्स बजावत आज चौकशीसाठी बोलावलं. आज ते ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने ईडी, सीबीआयला कामाला लावलं आहे, अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. यासोबतच, एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाई ही राजकीय हेतूनेच असल्याचा आरोप देखील केला जात आहे. खडसेंच्या चौकशीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला लक्ष्य केलं आहे.

खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे, असं जयंत पाटील म्हणाले. ‘खडसेंवर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा आरोप जयंत पाटील यांनी भाजपसह ईडीवर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!