🕒 1 min read
मुंबई : मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला होता. पुतळा हटवण्यास असलेला विरोध लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने रातोरात बुल्डोझर चालवून चौथरा उद्ध्वस्त केला. त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आणि स्थानिक युवकांनी नागपूर-छिंदवाडा महामार्ग काहीकाळ अडवून धरला होता.
काँग्रेसच्या राज्यात सावरकरांनंतर आता शिवरायांचा अवमान होत आहे असं म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर बुल्डोजर चालवतानाचा व्हीडीओ शेअर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद मध्य प्रदेशात आता चांगलाच पेटला आहे आणि त्याचे लोणं आता महाराष्ट्रातही येतील अशी चिन्ह आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत,’ असे ते म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात असून याची दखल महाराष्ट्रातील शिवसेना नेतृत्वातील सरकार घेईल काय? असा सवाल राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटमधून उपस्थित केला आहे. महाराष्ट्र भाजपानेही एक पोस्ट शेअर करत शिवसेनेला विचारणा केली आहे.
महाराष्ट्र की शिवसेना सरकार जिसमें कांग्रेस भी शामिल है, छत्रपति शिवाजी महाराज को आदर्श मानती है। उनका ऐसा अपमान क्या वे सह पाएंगे?
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 12, 2020
मुख्यमंत्री कमलनाथ जी क्षमा याचना करें और छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को ससम्मान स्थापित करने की तत्काल व्यवस्था करें।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 12, 2020
तसेच ‘महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्य प्रदेश मधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपले ‘प्रेम’ दाखवलेलेच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची. त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस’? असा प्रश्न महाराष्ट्र भाजपाने उपस्थित करून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्र का गौरव हैं,हमारे आराध्य हैं व देश की प्रेरणा के स्रोत हैं।
उनका अपमान किसी भी कीमत पर सहन नहीं किया जायेगा।अगर आपत्ति थी तो उनकी प्रतिमा को सम्मानजनक तरीके से भी हटाया जा सकता था लेकिन यह सरकार तो महापुरुषों का अपमान करने में गर्व का अनुभव करती है। pic.twitter.com/7shlvhjLdq
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 12, 2020
दरम्यान, ‘मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे JCB ने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे,’ अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. ‘स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल हजारो शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार! जय शिवराय!,’ असे उदयनराजे भोसले म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
