Share

कोरोनानंतर आता ‘या’ राज्यांवर ‘बर्ड फ्लू’चं संकट !

Published On: 

नवी दिल्ली : अद्याप देशावरच कोरोना संकट टळल नाही तोच आता काही राज्यांमध्ये आणखी एका साथीने धडक मारली आहे. या पार्श्वभूमीवर या राज्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. हे संकट आहे ‘बर्ड फ्लू’चं.

यामध्ये हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळ या राज्यांवर हे नवीन संकट ओढावलं तर सुदैवाने महाराष्ट्रात अद्यापही या साथीचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली असून बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी राजस्थानातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी 170हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर काही स्थलांतरित पक्षांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यामुळे हे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिमाचल प्रदेश मधील कांडगा जिल्ह्यातील पोंग बांध तलावात हे पक्षी आढळून आले आहे.

पशुपालन विभागाच्या माहितीनुसार 425हून जास्त कावळे, बगळे आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. झालावाडमधील पक्ष्यांचे काही नमुने परीक्षणासाठी भोपाळमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, इतर जिल्ह्यातील नमुन्यांचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!