🕒 1 min read
पटना – पुरामुळे लागवड करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांनाही राज्य सरकारकडून अर्थसाहाय्य दिलं जाईल असं बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितलं आहे. पीक नुकसानाच्या इतर सर्व प्रकरणांचे योग्य मूल्यमापन करण्याचे निर्देश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले .
राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत सुनिश्चित करण्यास नितीशकुमार यांनी सांगितलं. बिहारमध्ये आतापर्यंत 26 जिल्ह्यांमध्ये 16 लाख 60 हजार कुटुंब पूरामुळे बाधित झाली असून 69 लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत, यापैकी सुमारे आठ लाख प्रभावित कुटुंबांना मदत म्हणून 477 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलं आहे
दरम्यान, उर्वरित बाधित कुटुंबांना या महिन्याच्या अखेरीस मदत दिली जाईल अशी माहिती कुमार यांनी दिली. बिहार सरकार पूरग्रस्तांना प्रत्येकी सहा हजार रुपये देत आहे असं नितीश कुमार यांनी सांगितलं. बिहारमधील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- ‘नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
