🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची काही वेळापूर्वीच प्राणज्योत मालवली. देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे. ते ८४ वर्षांचे होते. मागील वर्षी त्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्नने गौरवण्यात आले होते.
प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून २५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७ पर्यंत काम पहिले. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी काम केले आहे. राष्ट्रपती पदापुर्वी त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याने आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन!
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, ‘ असाधारण विवेक असलेले, भारतरत्न मुखर्जी यांचे व्यक्तिमत्व हे परंपरा आणि आधुनिकतेचे संगम होते. ५ दशकांच्या गौरवशाली सार्वजनिक जीवनात अनेक मोठ्या पदांवर राहून देखील ते सदैव भूमीशी जोडले गेले होते. आपल्या शांत आणि मनमिळावू स्वभावाने ते राजकीय क्षेत्रात सर्वप्रिय होते.”
पूर्व राष्ट्रपति, श्री प्रणब मुखर्जी के स्वर्गवास के बारे में सुनकर हृदय को आघात पहुंचा। उनका देहावसान एक युग की समाप्ति है। श्री प्रणब मुखर्जी के परिवार, मित्र-जनों और सभी देशवासियों के प्रति मैं गहन शोक-संवेदना व्यक्त करता हूँ।
— President of India (@rashtrapatibhvn) August 31, 2020
राज्यात धार्मिकस्थळं लवकरच सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले : प्रकाश आंबेडकर
“भारताच्या प्रथम नागरिकाच्या रुपात त्यांनी राष्ट्रपती भवनसोबत लोकांची जवळीकता वाढवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे त्यांनी नागरिकांसाठी खुले केले. राष्ट्रपतींसाठी वापरण्यात येणाऱ्या महामहिम या शब्दाचा प्रयोग बंद करण्याचा त्यांचा ऐतिहासिक निर्णय होता”अशी भावना, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.
पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशियल ऑडिट होणे आवश्यक – आबा बागुल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

