कराड:- काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर याचं अलीकडंच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विलासराव उंडाळकर नेहमी पुरोगामी विचारांसाठी ओळखले जायचे. त्यांनी सलग 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं. 2004 च्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता. सहकार मंत्री म्हणून त्यांनी दमदार काम केलं होतं.
उंडाळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उंडाळे येथे गेले होते. त्यानंतर ते काल सायंकाळी कऱ्हाडला आले असता बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास कमरबंद चर्चा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्षपदासह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबादचे नामकरण याबाबत किंवा काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद असा फॉर्मुल्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले होते. त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. त्या चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या हालचालींसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत कपात तर, आठवलेंच्या सुरक्षेत वाढ : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- अनेकदा ऑस्ट्रेलिया चाहत्यांकडून रंगावरून टिप्पणी होते; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- वढु बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भिडे गुरुजींची भेट
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश


