मुंबई : भाजपा नेते अतुल भातखळकर हे आज दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. भातखळकर यांनी ‘सामना’ची एक बातमी ट्विट केली आहे. या बातमीत मुख्यमंत्र्यांनी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हणालेत की, साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर दोन समाजात तेढ निर्माण निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दुपारी १२.३० वाजता समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जाणार आहे.
सकिनाका बलात्कार प्रकरणानंतर दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याविरोधात दुपारी 12.30 वाजता समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जाणार आहे. pic.twitter.com/VRo7ADHPQg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 14, 2021
‘माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत; नराधमांना वचक बसावा. परराज्यांतून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल ; कुठून येतात… कुठे जातात हे बघावेच लागेल अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना केल्याचा उल्लेख बातमीत केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ सप्टेंबर रोजी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महिला सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी या सुचना केल्यात.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने बुमराहला हरवत जिंकला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
- अलिबागमध्ये रणवीर-दीपिकाने तब्बल 90 गुंठे जागा केली खरेदी
- ‘अब्बाजान’ शब्दप्रयोगानंतर योगींविरुद्ध सीजेएम कोर्टात तक्रार दाखल
- सोमय्या यांनी बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केलाय – नवाब मलिक
- शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात सादर करणार – वळसे-पाटील


