Share

‘गावा-गावातली बोलत आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु’ म्हणत आठवलेंची दारू दुकाने बंदच ठेवण्याची मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  ‘गावा-गावातली बोलत आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु’ अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरे सरकारकडे वाईन शॉप्स सुरु करु नका, अशी मागणी केली आहे.

माझं राज्य सरकारला निवेदन आहे, की लॉकडाउनच्या कालखंडात अनेक लोक जे दारु पित होते, नशा करणारे होते. दारुची दुकानं बंद असल्याने त्यांची दारु बंद झाली आहे. त्यामुळे दारुची दुकानं सुरु करणं योग्य राहणार नाही, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

अनेक लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार सावरले जात आहेत. अनेक घरांमधल्या महिला खुश आहेत. गावा-गावतली म्हणू लागली आहे पारु आता माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु. अशा पद्धतीचं आनंदाचं वातावरण महिलांमध्ये आहे. छोट्याश्या महसुलासाठी दारुची दुकानं सुरु केली तर मद्यपान करणाऱ्या लोकांना वाव मिळेल, असं आठवले म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी पत्र पाठवून राज्य सरकारने महसुलासाठी वाईन शॉप सुरु करण्याचा विचार करावा अशी सूचना केली होती. त्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीकाही करण्यात आली.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!