🕒 1 min read
नवी मुंबई:- येत्या काही दिवसांत राज्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने हुकमी मोहरे निवडले आहेत.
नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांना नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे.
गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापुढे आहे.
दरम्यान, आता भाजप नेते आशिष शेलार यांनी मिशन नवी मुंबई हाती घेतले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमधील मतभेद दूर करण्यासाठी आशिष शेलार आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. आशिष शेलार यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शेलार आणि म्हात्रे या दोघांमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात जवळपास एक तास चर्चा केल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
- “CAA, NRC, राम मंदिर उभारलं जात असल्याचं दुख: असल्याने कृषी कायद्याला विरोध होत आहे”
- ग्रामपंचायत निवडणुकीचा सोशल मीडियावर धुरळा
- शंभर कोटी रुपयांच्या निधीतून झालेले रस्ते निकृष्ट, अतुल सावे यांची तक्रार
- अनुष्काची सिक्युरिटी वाढवली; घरच्यांना देखील भेटता येणार नाही…
- ‘पुरुष नेत्याच्या संपर्कात असलेल्याच महिलेला निवडणुकीचं तिकीट दिलं जातं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
