🕒 1 min read
नागपूर:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ पाहायला मिळाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेस उमेदवार विजयी ठरलाय.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पराभव का झाला? या मागील कारण शोधण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार कामाला लागले आहेत. शेलार यांना भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आशिष शेलार तीन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते काल (26 डिसेंबर) संध्याकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी आज (27 डिसेंबर) सकाळपासून भाजपच्या जवळपास 80 पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नागपूरमधील कामे आटोपल्यानंतर ते उद्या अमरावतीत जाणार आहेत.
दरम्यान, दुसरीकडे या निवडणुकीत पुणे आणि मराठवाड्यातही पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींकडून भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाचे कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात जाऊन चिंतन करण्यास भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांकडून शिवसेनेला खड्यात घालण्याचं काम सुरू आहे- प्रसाद लाड
- शेतकरी आंदोलन : राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत नड्डा यांनी केली कॉंग्रेसची पोलखोल
- फरहान अख्तरचा ‘तूफान’ लवकरच, शेअर केली खास पोस्ट
- खडसे यांना पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही- जयंत पाटील
- जोपर्यंत भाजपची जिरवत नाही तोपर्यंत आम्ही एकत्र- विजय वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
