मुंबई : राज्य सरकारने नुकताच एक अध्यादेश मंजूर केला आहे. एकाच शासकीय विभागात पती-पत्नी जोडपे किंवा दोन मुलांना पदभार देण्यात येऊ नये, असे या अध्यादेशात नमुद आहे. दरम्यान यावरूनच ‘असा अध्यादेश अधिकाऱ्यांपुरताच मर्यादीत न ठेवता मंत्रीमंडळालाही लागू करा’, असा खोचक टोला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
‘फक्त अधिकाऱ्यांना कशाला मंत्रिमंडळालाही हे नियम लागू करा मुख्यमंत्री महोदय, कुटुंबातील दोघे एकाच ठिकाणी नको.’ असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दरम्यान राज्य सरकारने मंगळवारी काढलेल्या अध्यादेशात सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिले आहेत. आपल्या विभागात पती पत्नी किंवा त्यांचे मुले कार्यरत राहता कामा नये. यामुळे संबंधित विभागात त्या कुटुंबाची मक्तेदारी तयार होईल आणि भ्रष्टाचार वाढू शकतो. असे या अध्यादेशात नमुद करण्यात आले आहे.
फक्त अधिकाऱ्यांना कशाला मंत्रिमंडळालाही हे नियम लागू करा मुख्यमंत्री महोदय… कुटुंबातील दोघे एकाच ठिकाणी नको… pic.twitter.com/fdvO8g9KEL
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 16, 2021
तसेच सर्व विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना नियुक्ती व बदली देताना तपासून पाहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच कुणी एकाच ठिकाणी नियुक्ती देण्याचा हट्ट करत असेल तर त्यांना हा आदेश दाखवावा असेही म्हंटले आहे. तर यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मंत्री मंडळातीलही कुटुंबाची मक्तेदारी बंद करून हा नियम लागू करावा असा खोचक टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऊस तोडणी कामगारांनी ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं, युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
- भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’
- जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित; पर्यटन संचालकांनी दिली माहिती
- तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती


