Share

चुकीची माहिती पसरल्याने पोल्ट्री व्यवसायाचे नुकसान; सरकारने पॅकेज जाहीर करावे : आशिष शेलार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आणि देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यापासून सोशल मिडीयावर निरनिराळ्या अफवाही पसरत आहेत. यात चिकन आणि कोरोना यांचा संबंध जोडल्याच्या अफवांचा सर्वाधिक फटका राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसापूर्वी राज्य शासनाने प्रति पक्षी ५० रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही पोल्ट्री व्यावसायिकांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर कराव अशी मागणी केली आहे.

आशिष शेलार यांनी याबाबतच निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर दिली आहे. ‘कोरोना व्हायरसबाबत चुकीची माहिती पसरल्याने पोल्ट्री व्यवसायाचे ६००  कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले असून या व्यवसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज सरकारने जाहीर करावे, अशी मागणी मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन केली.’

दरम्यान राज्य शासनाकडून अद्याप यावर कुठलाही निर्णय झाल्याची माहिती नाही.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!