🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावं, अशी मागणी आता करण्यात येत आहे. त्यासाठी दिल्लीतील 6 शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी काल राळेगणसिद्धीत दाखल झाले होते. ह्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली.
मात्र, दिल्लीतील कडाक्याची थंडी, आपले वय, सुरक्षा आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेता हे शक्य होणार नसल्याचे सांगत हजारे यांनी त्यांची समजूत काढली. मात्र, आपल्या जुन्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी हजारे यांनी सरकारकडे मागितली आहे.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- …अन् गृहमंत्र्यांनी केले दिव्यांग लेकीचे कन्यादान !
- मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – उद्धव ठाकरे
- जिल्हा वासियांचे स्वप्न असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू – सामंत
- मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या आड कुणालाही येऊ देणार नाही – उद्धव ठाकरे
- किसान एकता मंचचं पेज तीन तासांनी पुन्हा ‘अनब्लॉक’ केल्यानंतर फेसबुककडून खुलासा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
