औरंगाबाद : ग्रामीण भागामध्ये दिवसेदिवस वाढत असलेले कोरोना रुग्णांचे आकडे लक्षात घेता, जिल्हा परिषद अलर्ट झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या गावांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. या कामात आरोग्य कर्मचाऱ्यांसह शिक्षक आणि अंगणवाडी सेवकांची मदत घेतली जाणार आहे.
शहरी भागात असलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पसरला आहे . त्यामुळे आतापर्यंत बाधित 210 गावांत सुपर स्प्रेडरचा शोध आणि तपासणी तसेच लसीकरण फोकस करण्याच्या सूचना ग्रामीण आरोग्य यंत्रणेला जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग देखील मोठ्या प्रमानात कामाला लागला असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये अंगणवाडी सेविका तसेच शिक्षकांमार्फत सर्वेक्षण केले जाणार असून गावात कोणाला ताप येतो का , कोणाला सर्दी, खोकला झाला का, आदी आजाराच्या बाबत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारीही प्रत्येक गावात जाऊन कोविड संदर्भात नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दागिने बनविणाऱ्या बंगाली कारागिरांनी लांबवले ७७ तोळ्यांचे दागीने
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

