पुणे :महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद वरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ‘कोणी मला सांगेल का आज वसूली चालू की बंद?’, असा खोचक टोला लगावत मिसेस फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला होता. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यातही आजकाल काही ताळमेळ नसतो. संवेदनहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परपेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी, अशा खोचक शब्दात रुपाली चाकणकरांनी अमृता फडणवीसांना सुनावलं आहे.
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो??
संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी. https://t.co/SdHZLYxPmp
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 11, 2021
दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी या बंदला विरोधी पक्षाने तीव्र विरोध दर्शवत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- ‘अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे, मात्र राज्य सरकारने अद्यापही मदत जाहीर केली नाही’
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’


