Share

लग्नाप्रमाणेच जागरण-गोंधळाला परवानगी द्या, मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

Published On: 

उस्मानाबाद : कोरोनामुळे सध्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. पण लग्न समारंभाप्रमाणे नियम लावून जागरण-गोंधळ या धार्मिक विधीला राज्यभर परवानगी देण्याची मागणी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यात लग्न समारंभापूर्वी लग्नघरी कुलदैवतांचा जागरण गोंधळ घालण्याची परंपरा आहे. लग्न समारंभास जे नियम कोरोना प्रतिबंधक काळात आहेत, त्याप्रमाणे नियम घालून जागरण-गोंधळ विधी करण्यास प्रशासनाने परवानगी देण्याची मागणी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जोपर्यंत जागरण गोंधळ विधीला परवानगी मिळत नाही, तोपर्यंत गोंधळी समाजाला अत्यावश्यक किराणा साहित्य पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. तुळजापूरचे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!