🕒 1 min read
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतो. अक्षयचे देश आणि आपल्या सैनिकांप्रती असणारे प्रेम हे सर्वश्रुत आहे. याचेच चित्र सध्या पहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात अक्षयने भारतीय सैनिक व वीर जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाला एक वेबसाईट बनविण्याची विनंती केली होती. अक्षयच्या विनंतीवर ‘भारत के वीर’ नामक वेबसाईट गृह मंत्रालयाने बनविली. या वेबसाईटला जगभरातील भारतीय नागरिकांनी देखील भरभरू प्रतिसाद दिला आहे.
नुकतेच अक्षयला एका जागतिक गुतंवणूक परिषदेत बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. या परिषदेसाठी जगभरातील अनेक मोठे उद्योजक उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्षयने भारतीय सैनिकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘भारत के वीर’ या वेबसाईट बद्दल उपस्थिताना माहिती दिली. अक्षयने दिलेल्या माहितीने उपस्थित अनेक उद्योजक प्रभावित झाले. आणि बघता बघता काही मिनिटांतच ६.५ कोटी इतकी रक्कम भारत के वीर जवानांसाठी जमा झाली. अक्षयच्या याच कामाची चर्चा सर्वत्र चर्चेचा विषय आहे.
Glad to be at @MotilalOswalLtd's Annual Global Investor Conference to discuss @BharatKeVeer and do the least we can, contribute! pic.twitter.com/Flkm9QX7FX
— Akshay Kumar (@akshaykumar) September 4, 2017
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

